बेंगलोर, मे ८, २०११
श्री श्री रवी शंकर: स्वतः ला शांत ठेवण्यासाठी दिवसातला काही वेळ आपण मोकळा ठेवला पाहिजे. यासाठी, आपण सजग राहिले पाहिजे की जे आज आहे ते काही काळाने नसणार आहे, पाण्याच्या बुडबुड्यासारखे. अस्थिरतेबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. आपण जगतो तर आनंदात जगावे आणि इतरांना आनंदात ठेवावे. आपण जेंव्हा मृत्यूला आठवतो तेंव्हा आयुष्याचे प्रश्न कमी वाटतात.
आपण जगताना आपल्याला दोन गोष्टी मिळवायच्या असतात - आपण किती प्रेम वाटले आणि किती ज्ञान मिळवले. याच दोन गोष्टी अशा आहेत की ज्या मेल्यावर सुद्धा आपल्याबरोबर राहतात.
दररोज थोडावेळ बसून ध्यान केले पाहिजे - दुसरे की विचार करतात अशा अनावश्यक गोष्टींपासून मोकळे व्हा. आपल्याला हे जाणून घेतले पाहिजे की देव(परमात्मा) सगळ्यांमध्ये आहे. जर तो सगळ्यांमध्ये नसेल, तर आपण त्याला देव म्हणू शकत नाही. तो नेहमी इथे आहे, सगळीकडे आणि आपल्या सगळ्यांमध्ये. आपण डोळे बंद करून त्याला पाहतो आणि यालाच ध्यान म्हणतात. गुरु, देव आणि आत्मा हे सारखेच आहेत.
जेंव्हा तुम्ही आश्रमात येत, तुमचा सगळ्या चिंता इथेच सोडून द्या - त्यांना तुमाचाबारोब्र परत घेऊन जाऊ नका.
तुम्ही जेंव्हा सेवा करता, तुमचा गरजांची काळजी घेतली जाते. आपले काम ज्ञान पसरवणे हे आहे. तुम्ही ज्ञान पसरवा, आणि तुम्हाला जे गरजेचे आहे ते आपोआप होईलच.
आपली स्वतःची कमाई स्वतःवरच खरच करण्यात काही अर्थ नाही. त्यातले २-३ टक्के सामाजिक कार्य, धर्म जागृती (सत्य पसरवणे) यासाठी दिले पाहिजेत – त्याने भ्रष्टाचार कमी होईल. आपण सगळे एकत्र आले पाहिजे आणि देशवासियांना त्यासाठी उत्तेजन दिले पाहिजे.
जेंव्हा तुम्हाला प्रश्न पडेल स्वतःला विचारा, आणि जर उत्तर नाही मिळाले, तरच तुमच्या गुरूला विचारा. तुमच्या प्रारब्धानुसार(मागचे कर्म) तुम्हाला बाकीचा गोष्टी मिळतील आणि सगळ्या चांगल्याच गोष्टी होतील.
संगीत, ध्यान आणि ज्ञान - या तीनही गोष्टी आयुष्यात असल्या पाहिजेत
मंगळवार, २६ एप्रिल २०११
आर्ट ऑफ लिविंग केंद्र ,टेक्सास,अमेरिका
१२, एप्रिल,२०११
प्रश्न: न्यायासाठी लढताना शांती कशी ठेवू शकतो?
श्री श्री रवि शंकर: हेच संपूर्ण भगवत गीतेचे सर आहे. आतून शांत राहून जेंव्हा आवश्यक असेल तेंव्हा कृत्य करावे. जेंव्हा आवश्यक असेल तेंव्हा लढावे, परंतु त्या लढाईला आपल्या मनात ठेवू नये. बऱ्याच वेळा आपण आत लढत राहतो आणि बाहेर शांत राहतो. आपल्याला त्याच्या विरुद्ध केले पाहिजे. ध्यानाद्वारे हे परिवर्तन आणणे सहज शक्य आहे. सत्व आणि ध्यान याची शक्ति हे सगळे सोप्पे बनवते.
आज रामनवमी आहे. रा चा अर्थ आहे प्रकाश, आणि म चा अर्थ आहे मी. राम चा अर्थ आहे “ माझ्या आतला प्रकाश” रामाचा जन्म दशरथ आणि कौशल्या यांचा इथे झाला. दशरथ चा अर्थ आहे “दश रथ”. दश रथ पांच इन्द्रिय आणि पांच ज्ञान आणि कृत्य यांना दाखवतो. (उदाहरणार्थ ; प्रजनन,पाय,हात, इत्यादि) कौशल्या चा अर्थ आहे ‘कौशल’. अयोध्या चा अर्थ आहे, “असा समाज जिथे अजिबात हिंसा नाही” जेंव्हा तुम्ही अतिशय बारकाईने याचाकडे बघाल, की आपल्या शरीरात काय प्रेवेश करत आहे, आपल्या आत प्रकाश वाढत आहे. तेच ध्यान आहे. आपल्याला तणावातून मुक्त होण्यासाठी काही कौशल्याची आवश्यता आहे. मग तुम्ही पसरायला सुरुवात होते.
तुम्हाला माहिती आहे की आत्ता तुम्ही इथे आहात तरी तुम्ही इथे नाही. या अनुभवाने की काही प्रकाश लगेच येतो. जेंव्हा आतल्या प्रकाशात चमक येते तेंव्हा तो राम आहे. सीता जे मन/बुद्धि आहे, त्याला अहंकार(रावण) पळवून घेऊन जातो. रावणाला दहा तोंडे होती. रावण (अहंकार) असा होता, जो कुणाचेही ऐकत नसे. तो स्वतःच्या डोक्यात (अहंकार) अडकलेला असे. हनुमान चा अर्थ श्वास आहे. हनुमान (श्वास) चा सहाय्याने सीता(मन) आपल्या रामाजवळ (स्त्रोत्र) जाऊ शकली.
रामायण ७,५०० वर्ष पूर्वी घडले. त्याचा जर्मनी आणि यूरोप आणि पूर्वेचा खूप देशांवर प्रभाव पड़ला. हजारों पेक्षा अधिक नगरांचे नाव रामावरून पडले. जर्मनी मध्ये रामबौघ,इटली मध्ये रोमचे मूळ राम या शब्दामाधेच आहे. इंडोनेशिया, बाली आणि जापान सगळे देश रामायणाने प्रभावित झाले आहेत. तसे तर रामायण एक इतिहास आहे परन्तु ही अशी अनंत घटना आहे,जी नेहमी घडत असते.
प्रश्न: गुरु आदर्श भक्तामध्ये कुठले गुण बघू इच्छितो?
श्री श्री रवि शंकर: कुठलेच नाही. जर मी कुठला एक गुण सांगितला, तर तुम्ही तोच पाळायला लागाल. यासाठी स्वतःबरोबर स्वाभाविक आणि ईमानदार राहा. जर एक दिवस सुद्धा तुमचे ध्यान करायचे राहिले तर त्यासाठी काळजी करत बसू नका. समय तुम्हाला घेऊन चालला आहे. ज्या काही चांगल्या गुणांचा शोध तुम्ही घेत आहात, ते तसेही तुमाचामध्ये आहेत. तुम्ही इथे आहात आणि सगळे चांगले करत आहात.
उचित आहार घेऊन आपण आपले शरीर शुद्ध ठेवू शकता. वर्षातले २-३ दिवस व्रत ठेवणे चांगले असते. रस घेऊन व्रत करा. परंतु जर तुमचे शरीर याला अनुमति देत नसेल तर करू नका. तुम्हाला तुमच्या शरीराकडे पण लक्ष दिले पाहिजे.
मन प्राणायाम आणि सुदर्शन क्रिया यांच्या द्वारे शुद्ध होते.
बुद्धि ज्ञानाद्वारा शुद्ध होते.
भावना भजन केल्याने शुद्ध होतात.
सेवा केल्याने कृत्य शुद्ध होतात.
दान केल्याने धन शुद्ध होते.
तुम्ही तुमच्या उत्पन्नातले २ ते ३ % दान केले पाहिजे.
प्रश्न: येणाऱ्या वर्षांमध्ये तुमचा आर्ट ऑफ लिविंग साथी काय दृष्टिकोण आहे?
श्री श्री रवि शंकर :मी त्याची सुरुवात केली आहे. मी माझे काम केले आहे. आता हे तुमच्यावर आहे. तुमच्याकडे दृष्टिकोण आहे, यासाठी तुम्ही त्याला जिथे हवे तिथे घेऊन जा. आम्ही जर्मनीमध्ये आर्ट ऑफ लिविंग च्या ३० वर्ष पूर्ण होण्याचा उत्सव साजरा करणार आहोत. हिटलर नी ७५ वर्षांपुर्वी जसे ओलंपिक स्टेडियम बनवले होते. आपण तिथेच असू. त्यांनी युद्धाची सुरुवात तिथूनच केली. ज्या जागेतून युद्धाची सुरुवात झाली, आपण तेथूनच शांतीचा प्रचार करूयात.
प्रश्न: खूपशा युद्धाचे कारण धर्म का असतो?
श्री श्री रवि शंकर: मला पण आश्चर्य वाटते. जगामध्ये १० मुख्य धर्म आहेत. ४ मध्य पूर्व आणि ६ पूर्व देशांमधले आहेत. पूर्वेकडील ६ धर्मांमध्ये अजिबात द्वंद्व नाही. हिंदू,बुद्ध,सिख, जैन,शिंटो आणि ताओ धर्म एकच वेळी अस्तित्वात होते. जेंव्हा राष्ट्रपति निक्सन जापानला गेले , तेंव्हा त्यांच्या एका बाजूला शिंटो संत होते आणि दुसर्या बाजूला बौद्ध संत होते. त्यांनी शिंटो संताना विचारले की जपानमध्ये शिंटो किती टक्के आहेत? संताने सांगितले ८०% त्यांनी परत बौद्ध संताला विचारले की जपान मध्ये बुद्ध कितने प्रतिशत है? संताने सांगितले ८०%. निक्सन ना आश्चर्य वाटले की हे कसे शक्य आहे. शिंटो बुद्ध मंदिरामध्ये जातात आणि बुद्ध शिंटो मंदिरामध्ये जातात. त्याच प्रकारे हिंदू सिख गुरूद्वारमध्ये जातात, आणि सिख हिंदू मंदिरामध्ये जातात. भारमध्ये हीच गोष्ट हिंदू आणि बुद्ध लोकांसाठी सांगितले जाऊ शकते. त्याच प्रकारे चीनमध्ये बुद्ध आणि ताओ धर्मामध्ये कोणतेही द्वंद नाही.
मध्य पूर्वेच्या चार धर्मांमध्ये नेहमी युद्ध झाले. यांनी इतर ६ धर्मांकडून शिकले पाहिजे की एकत्र कसे टिकून राहिले पाहिजे. ईसाई आणि यहूदी धर्म यांचाशी मित्रता आहे. यहूदी आणि इस्लाम धर्मामध्ये काही त्यांचातला मुद्दा आहे.
प्रश्न: कर्म आणि भाग्य यात काय अंतर आहे ?
श्री श्री रवि शंकर: भाग्य याचा अर्थ आहे विधि म्हणजे हे आहे हे असेच आहे. कर्म याचे अनेक अर्थ आहेत. याचा अर्थ कृत्य किंवा अप्रत्यक्ष कृत्य सुद्गा होऊ शकतो. काही कृत्यांचा संस्कारामुळे कुठले दुसरे कृत्य उत्पन्न होऊ शकते आणि त्यालाही कर्म म्हणू शकतो.